राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना केंद्र सरकारनं मोठा दिलासा दिला आहे. आता फास्टॅग नसेल तरी दुप्पट टोल टॅक्स (पथकर) भरावा लागणार नाही. 15 नोव्हेंबर 2025 पासून हा नियम लागू होणार आहे.

सध्याच्या नियमानुसार FAST टॅग ऐवजी रोख किंवा UPI ने टोल भरणाऱ्या वाहनधाराकांना सद्या टोल रकमेच्या दुप्पट टोल द्यावा लागत आहे. मात्र, 15 नोव्हेंबरपासून केंद्र सरकारने या नियमांत बदल केला असून वाहनधारकांना मोठा दिलासा दिला आहे. नव्या नियमानुसार, UPI म्हणजे ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमातून टोल भरणाऱ्या वाहनधारकांना तर फक्त 25% जास्त टोल भरावा लागणार, यापूर्वी दुप्पट म्हणजे 100 रुपयांऐवजी 200 रुपये टोला द्यावा लागत असते, जो आता 15 नोव्हेंबरपासून 125 रुपये द्यावा लागेल. राज्यातील राष्ट्रीय महामार्गावरुन गाड्या चालवणाऱ्या वाहनधारकांना UPI ने पेंमेंट केल्यास दिलासा मिळणार असून महाराष्ट्रातील NHAI च्या 96 टोल नाक्यांवर टोल देण्यासंदर्भातील नियमात सरकारने बदल केल्याने वाहनधारकांना याचा लाभ होणार आहे.
उदाहरणासह स्पष्टीकरण
उदाहरण पाहायाचे झाल्यास, एखाद्या NHAI TOLL चे दर 100 असतील तर फास्ट टॅगद्वारे पेमेंट केल्यास तुम्हाला फक्त 100 रू द्यावे लागतील. मात्र, जर तुम्ही UPI किंवा कॅश मध्ये पेमेंट केलं तर तुम्हाला, दंडामुळे दुप्पट टोल भरावा लागू शकतो म्हणजे 200 रुपये. मात्र, केंद्र सरकारने आता डिजिटल पेमेंटला सपोर्ट करण्यासाठी आणि UPI प्रमोट करण्यासाठी वाहनधारकांना दिलासा दिला आहे. म्हणजे, आता तुम्ही जर UPI ने टोल भरणार असाल तर तुम्हाला फक्त 200 ऐवजी 125 रू भरावे लागणार आहेत, म्हणजे सरकारने जवळपास 75 रू कमी केले आहेत. त्यामुळे, फास्टटॅग न वापरणाऱ्या वाहनधारकांना या निर्णयाचा मोठा दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळत आहे.